मोठी बातमी दोन दिवसात हे कागदपत्रे जमा करा! तरच अनुदान मिळणार Farmer’s Benifit Document

Farmer’s Benifit Document:राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांना आता सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज नऊ जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयंरद्द (अटोडिलिट) होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या विविध योजनांच्या

अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांना आता सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज नऊ जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयंरद्द (अटोडिलिट) होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय.State Employees Shasan Nirnay GR

कृषी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की महाडीबीटी प्रलीकडे अनुदानासाठी २०२१ पासून अर्ज आलेले होते. ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली. त्यानंतर सारे अर्ज ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाने निवडले. अंदाजे ४५ लाख अर्ज निवडण्यात आले. यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्रे सादर करण्याची अट होती. ती अटदेखील शासनाने स्थगित केली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास भरपूर कालावधी मिळाला. परंतु प्रशासनाला असे आढळून आले की काही लाख शेतकऱ्यांनी केवळ अर्ज भरले आहेत. निवड होऊनदेखील असे शेतकरी लाभ घेण्यास पुढे आलेले नाहीत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची निवड करण्यात अडथळा आलेला आहेत. त्यामुळेच अशा ३३ लाख शेतकऱ्यांना आता कृषी विभागाने भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून सात दिवसांची मुदत दिली..

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर तारीख आली समोर,राजकीय हालचालींना मोठा वेग Maharashtra Panchayat Raj Election Date

कृषी विभागाने महाडीबीटी प्रणाली आता अधिक सुटसुटीत केली आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आता अर्ज निवडलेल्या शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ उतारा, गाव-शिवाराचा पत्ता, आधार व बँक खाते क्रमांक अशी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.

परंतु यांत्रिकीकरणाची योजना असल्यास दरपत्रक (कोटेशन) तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजना असल्यास प्राकलन (इस्टिमेट) देणे अत्यावश्यक आहे. ही कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्वसंमतिपत्र दिले जाणार आहे. मात्र कागदपत्रे न दिल्यास असे अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसानंतर रद्द केले जाणार आहेत.

पूर्वसंमतिपत्रे मिळालेले अर्ज कायम राहणार

अनुदानासाठी विविध योजनांमधून आलेल्या अर्जदार काही लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच पूर्वसंमती दिली आहे. त्यांचे अर्ज बाद होणार नाहीत. मात्र या शेतकऱ्यांनी खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबीटी प्रणालीत त्यांची देयके (बिले) वेळेत सादर करणे हिताचे आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment