राज्यात गरिबांना २५ वर्षे मोफत वीज! महाराष्ट्र सरकारची मोठी योजना; Free Light Scheme 2025

Free Light Scheme 2025:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गरिबांसाठी मोठी योजना आणली आहे. त्यानुसार दरिद्र्यरेषेखालील गरीब ग्राहकांना तब्बल २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध होणार आहे. महावितरणमार्फत महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या योजनेबाबत जाणून घेऊ या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने राज्यात स्मार्ट योजना सुरू केली आहे. त्यात दारिद्र्य रेषेखालील १ लाख ५४ हजार तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३ लाख ४५ हजार अशा पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळणे शक्य आहे.

HDFC बँकेकडून मिळेल 4 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया. HDFC Bank Personal Loan

या योजनेत महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूदही शासनाने केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्याच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते.

स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल. स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो.

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक. Election Commission PC

राज्य सरकारकडूनही अनुदान

शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.

एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ ग्राहकांना लाभ होतो, असा महावितरणचा दावा आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment